पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस ऑलिम्पिकला जाणाऱ्या टीमसोबत संवाद साधला. त्यावेळी एका खेळाडूला एका गोष्टीची आठवण करुन दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिल्लीत टी-20 वर्ल्डकप वर नाव कोरणाऱ्या भारतीय टीमशी संवाद साधला. त्यानंतर शुक्रवारी मोदींनी पॅरिस ऑलिम्पिकला जाणाऱ्या टीमसोबत बातचीत केली. यावेळी भालाफेक चॅम्पियन नीरज चोप्राशी बोलताना पंतप्रधान मोदी फूल मस्तीच्या मूडमध्ये होते. नीरज चोप्राने, हॅलो सर, तुम्ही कसे आहात? असा प्रश्न विचारल्यानंतर मोदींनी त्याला एका गोष्टीची आठवण करुन दिली.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी तोच आहे. पण अरे! तू तर चुरमा आणलायच नाही. हे ऐकताच नीरज लाजला आणि म्हणाला की, सर, मी नक्की आणेल. मागच्या वेळी दिल्लीत साखरेचा चुरमा होता. हरियाणामधील चुरमा तुम्हाला खाऊ घालेल. त्यावर मोदी म्हणाले की, मला तुझ्या आईच्या हातचा चुरमा खायचा आहे. यावर नीरजने त्यांना नक्कीच म्हणत आश्वासन दिलं.खरं तर ही चुरमाचा किस्सा 4 वर्षांपूर्वीचा आहे. ज्याची आठवण मोदींनी करुन दिली. 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमधील पदक विजेत्यांसह मोदींनी नाश्ता केला होता.
Paris Olympics 2024 Neeraj Chopra PM Narendra Modi
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
'अरे बाबा मी काहीच...,' प्रश्न ऐकल्यानंतर राहुल द्रविड रिपोर्टवर संतापला, म्हणाला 'माझ्याकडे इतरही अनेक...'पत्रकाराने 1997 मध्ये वेस्ट इंडिजविरोधात खेळलेल्या कसोटी सामन्याबद्दल विचारलं असता राहुल द्रविडला ते फारसं आवडलं नाही.
Read more »
पतीच्या निधनानंतर नोकरीवर दावा करण्यासाठी एक नाही, 2 नाही तर 3 बायका पोहोचल्या, पुढे जे झालं...सरकारी नोकरीमध्ये असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याचा कुटुंबातील बायको आणि मुलांना त्याची नोकरी मिळते. अशातच एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या नोकरीवर दावा ठोकण्यासाठी तीन बायको पुरव्यासोबत पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात पोहोचल्या. हे पाहून कार्यालयातील अधिकारी बुचकळ्यात पडले आहेत.
Read more »
पंतप्रधानपदी विराजमान होताच मोदींचा पहिला मोठा निर्णय; शेतकऱ्यांना थेट फायदाPM Modi First Decision : देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर मोदी नेमका कोणता निर्णय घेणार याचीच उत्सुकता अनेकांना लागून राहिली होती; आणि अखेर पंतप्रधान मोदींनी मोठा निर्णय घेतलाच...
Read more »
Victory Parade : पाय ठेवायला जागा नाही पण अँब्यूलन्सला काढून दिली वाट, मुंबईकरांनी काळीज जिंकलं; पाहा VideoTeam India Victory Parade : एकीकडे टीम इंडियाच्या आगमनाची प्रतिक्षा होत असताना लाखोंच्या गर्दीत एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये मुंबईकरांनी अँब्युलन्सला वाट मोकळी करून दिली.
Read more »
विधानसभेत 288 जागा लढणवार? मनोज जरांगे म्हणतात 'मराठ्यांची ताकद दाखवणार'Manoj Jarange Exclusive : आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर पुन्हा एकदा मराठा आपली ताकद दाखवेल, 288 जागांवर पाडायचे की निवडून आणायचे यावर बैठकीत निर्णय घेणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे.
Read more »
पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली! 24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार, एका वर्षात 365 पेक्षा कमी दिवस येणार24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार आहेत. कधी पासून होणार हा बदल जाणून घेऊया.
Read more »