Team India Victory : टी20 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचं गुरुवारी मायदेशात जंगी स्वागत करण्यात आलं. नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम अशी ही जंगी मिरवणूकही काढण्यात आली. आता महाराष्ट्रातील चार खेळाडूंचा राज्य सरकारतर्फे सत्कार करण्यात येणार आहे.
टी20 वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाचं मुंबईकरांनी जल्लोषात स्वागत केलं. मुंबईत विश्वविजेत्या टीम इंडियाची जंगी मिरवणूक काढण्यात आली.नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम अशी ही जंगी मिरवणूक निघाली. त्यावेळी नरिमन पॉईंट परिसरात टीम इंडियाच्या स्वागतासाठी लाखो चाहत्यांचा जनसागर उसळला. मरिन ड्राईव्हचा अथांग समुद्रकिनारा आणि त्याच्या समोरच लाखो चाहत्यांचा जनसागर असं हे चित्र होतं. ओसंडून वाहणारा उत्साह, आसमंत भेदणारा जल्लोष असं हे सगळं वातावरण होतं.
आज दुपारी 4 वाजता विधानभवनच्या सेंट्रल हॉल इथं रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव , शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल या चार खेळाडूंचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलाय. या चारही खेळाडूंना राज्य शासनाकडून प्रत्येकी 1 कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात येणारेय.टी-20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा सत्कार विधीमंडळात होणारे. त्यापूर्वीच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडायला लागल्या आहेत. विधान परिषदेमध्ये विरोधकांनी निमंत्रण नसल्याचा मुद्दा उपस्थित केला.
Team India Team India Four Players Felicitated By Maharastra Rohit Sharma Suryakumar Yadav Shivam Dube Yashasvi Jaiswal महाराष्ट्र सरकार विधीमंडळ
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
अमोल कोल्हे यांच्या कार्यक्रमात ठाकरे गटाच्या शिवसेनेचा राडा; महाविकासआघाडीत महाबिघाडीशरद पवार पक्षाचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमात ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला.
Read more »
कंगनाला कानशिलात लगावणाऱ्या CSIF जवानाला सोन्याची अंगठी पाठवणार; 'या' पक्षाने केली घोषणाभाजपाची नवनिर्वाचित खासदार कंगना रणौतला (Kangana Ranaut) कानशिलात लगावणाऱ्या सीआयएसएफ (CISF) जवानाला सोन्याची अंगठी बक्षीस म्हणून पाठवण्याची घोषणा करण्यात आली आहे.
Read more »
पराभूत होऊनही पंकजा मुंडे यांना थेट आमदार का बनवणार ? भाजपचा आजपर्यंताचा सर्वात मोठा राजकीय प्लानपंकजा मुंडेंचं लवकरच विधिमंडळात कम बॅक होणार आहे. पराभव होऊनही भाजपने पंकजा मुंडे यांना संधी का दिली जाणून घेऊया.
Read more »
'मी महाराष्ट्राची माफी मागतो, अंबादास दानवे यांनी...', विधानपरिषदेतील गोंधळावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?Uddhav Thackeray Apologized maharastra : अंबादास दानवे यांच्यामुळे मी महाराष्ट्रातल्या मताभगिनीचा अपमान झाला असेल तर मी पक्षप्रमुख म्हणून मी माफी मागतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
Read more »
बीसीसीआयने 125 कोटी दिलेत, पण या चार खेळाडूंना रुपया पण मिळणार नाही?BCCI Prize Money Distribution : टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरल्याचा पराक्रम केल्याने बीसीसीआयने खुश होवून तब्बल 125 कोटींचं बक्षिस जाहीर केलंय.
Read more »
विश्वविजेत्या टीम इंडियाची मुंबईत विजयी मिरवणूक; गर्दी टाळण्यासाठी वाहतूकीत मोठा बदलBCCI unveils victory parade in Mumbai : विश्वविजयी टीम इंडियाची मुंबईत भव्य मिरवणूक काढली जाणार. मुंबईत संध्याकाळी 5 नंतर मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी ही टीम इंडियाची विजयी परेड असणार आहे.
Read more »